अडीच वर्षाचा मुलगा आहे त्याला आकड़ी येते तसेच अजुन मान पण धरत नही काही उपाय सांगा..
डॉ. शिवकृष्ण (आयुर्वेद) - आकडी येणे म्हणजे मुलांना fits येतात, यामध्ये muscle contraction (स्नायू आखडणे) एवढे असते की ते बाहेरून ताकद लावूनसुद्धा सहसा लवकर निघत नाही, अश्या मुलांमध्ये जीभ दातांमध्ये अडकून ती तुटुही शकते.
ही लक्षणे आयुर्वेदाने 'अस्थिमज्जा धातू विकृती आणि मानसविकार 'अंतर्गत सांगितली आहेत, चांगल्या मेंदूतज्ज्ञाचा सल्ला घेऊन सोबत आयुर्वेदिक ट्रीटमेंट पण सुरू ठेऊ शकता, आत्तापर्यंत ६ पेक्षा जास्त लहान मुलांमध्ये सकारात्मक बदल पाहिले आहेत आणि त्यांना चालणे व बाकी साधारण गोष्टी करण्यासाठी सक्षम बनवलं आहे.
डॉ. विकास खामकर (ऍलोपॅथी) -
१. नैसर्गिक वाढीप्रमाणे अडीच वर्षांच्या मुलाला आतापर्यंत मान पकडणे चालणे,पळणे,जिना चढणे या गोष्टी आपोआप यायला हव्यात.
२. आकडी येणे व नैसर्गिक विकासाचे ठप्पे न गाठणे ही गंभीर बाब आहे.ही सगळी लक्षणे एका मोठ्या आजारसमूहाचा(syndrome) भाग वाटत आहेत.
३. लवकरात लवकर लहान मुलांचे डॉक्टर व मेंदूचे तज्ज्ञ(neurologist) यांना बाळ दाखवावे.
डॉ. प्रकाश गंभीर (बालरोग तज्ज्ञ आणि आनुवंशिक रोग तज्ज्ञ) -
या मुलाची दोन्ही लक्षणे ही महत्त्वाची आहेत. सर्वसाधारणपणे मूल ३ महिन्यापर्यंत मान धरायला लागते ते जर अडीच वर्षाला पकडत नसेल तर हे मेंदूच्या मज्जातंतूंच्या किंवा स्नायूच्या आजाराचे लक्षण असू शकेल.
आकडी जर त्याबरोबर असेल तर मेंदूच्या आजाराची शक्यता बळकट होते. ही दोन्ही लक्षणे असल्याने हा गंभीर आजार असू शकतो. त्यामुळे बालरोगतज्ञ मेंदूविकारतज्ञ आणि आनुवंशिक विकार तज्ञ यांचा त्वरित सल्ला घेणे अत्यावश्यक आहे.
______________________
अधिक माहितीसाठी वाचा :
आकडीवर उपचार शक्य!
लोकसत्ता - https://goo.gl/1qK9NQ
आकडी -
मराठी विश्वकोश - https://goo.gl/5YMc7X
______________________
तात्पर्य :- अधिक वेळ न दवडता वर सांगितलेल्या चांगल्या बालरोगतज्ज्ञ, मेंदूविकारतज्ज्ञ यांना भेटून उपचार सुरू करावेत.
#लोकभाषामराठी
#मुलांचीशाळामराठी
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
डॉ. शिवकृष्ण (आयुर्वेद) - आकडी येणे म्हणजे मुलांना fits येतात, यामध्ये muscle contraction (स्नायू आखडणे) एवढे असते की ते बाहेरून ताकद लावूनसुद्धा सहसा लवकर निघत नाही, अश्या मुलांमध्ये जीभ दातांमध्ये अडकून ती तुटुही शकते.
ही लक्षणे आयुर्वेदाने 'अस्थिमज्जा धातू विकृती आणि मानसविकार 'अंतर्गत सांगितली आहेत, चांगल्या मेंदूतज्ज्ञाचा सल्ला घेऊन सोबत आयुर्वेदिक ट्रीटमेंट पण सुरू ठेऊ शकता, आत्तापर्यंत ६ पेक्षा जास्त लहान मुलांमध्ये सकारात्मक बदल पाहिले आहेत आणि त्यांना चालणे व बाकी साधारण गोष्टी करण्यासाठी सक्षम बनवलं आहे.
डॉ. विकास खामकर (ऍलोपॅथी) -
१. नैसर्गिक वाढीप्रमाणे अडीच वर्षांच्या मुलाला आतापर्यंत मान पकडणे चालणे,पळणे,जिना चढणे या गोष्टी आपोआप यायला हव्यात.
२. आकडी येणे व नैसर्गिक विकासाचे ठप्पे न गाठणे ही गंभीर बाब आहे.ही सगळी लक्षणे एका मोठ्या आजारसमूहाचा(syndrome) भाग वाटत आहेत.
३. लवकरात लवकर लहान मुलांचे डॉक्टर व मेंदूचे तज्ज्ञ(neurologist) यांना बाळ दाखवावे.
डॉ. प्रकाश गंभीर (बालरोग तज्ज्ञ आणि आनुवंशिक रोग तज्ज्ञ) -
या मुलाची दोन्ही लक्षणे ही महत्त्वाची आहेत. सर्वसाधारणपणे मूल ३ महिन्यापर्यंत मान धरायला लागते ते जर अडीच वर्षाला पकडत नसेल तर हे मेंदूच्या मज्जातंतूंच्या किंवा स्नायूच्या आजाराचे लक्षण असू शकेल.
आकडी जर त्याबरोबर असेल तर मेंदूच्या आजाराची शक्यता बळकट होते. ही दोन्ही लक्षणे असल्याने हा गंभीर आजार असू शकतो. त्यामुळे बालरोगतज्ञ मेंदूविकारतज्ञ आणि आनुवंशिक विकार तज्ञ यांचा त्वरित सल्ला घेणे अत्यावश्यक आहे.
______________________
अधिक माहितीसाठी वाचा :
आकडीवर उपचार शक्य!
लोकसत्ता - https://goo.gl/1qK9NQ
आकडी -
मराठी विश्वकोश - https://goo.gl/5YMc7X
______________________
तात्पर्य :- अधिक वेळ न दवडता वर सांगितलेल्या चांगल्या बालरोगतज्ज्ञ, मेंदूविकारतज्ज्ञ यांना भेटून उपचार सुरू करावेत.
#लोकभाषामराठी
#मुलांचीशाळामराठी
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
No comments:
Post a Comment